शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पंपाला हात मारणार; पाणी नाही तर अ‍ॅक्टिंग सोडणार अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी: वेळू ग्रामस्थांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:33 IST

रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेची जिल्ह्यात जोरदार तयारी, अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी

 रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली. महाराष्ट्र पाणीदार करण्याचे तुमचे-आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळूकरांची शेवटपर्यंत साथ हवी आहे,’ असे भावनिक आवाहन अभिनेते अमीर खान यांनी केले.कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे वडजाई देवी मंदिरात पाणी फाउंडेशन आयोजित परिसंवादात अमीर खान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी डॉ. अविनाश पोळ, स्वाती भटकळ, सरपंच लक्ष्मीबाई भोसले, सतीश भोसले, माजी सरपंच लहुराज भोसले, सुखदेव भोसले, शरद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.अमीर खान पुढे म्हणाले, ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू केली तेव्हा या स्पर्धेमध्ये लोक सहभागी होतील का ? आम्ही जे सांगतोय ते योग्य आहे का ? ग्रामस्थ यामध्ये काम करतील का ? असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले होते. या स्पर्धेत वेळू गाव सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकदीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी दिली. तुम्हीच वेळ दिला, मेहनत घेतली. त्यामुळे वेळू गावाचा पाणी प्रश्न सुटला, ही फार मोठी गोष्ट आहे. या गावाकडे बघून इतर गावांना प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही इतर गावांना या कामाबाबत माहिती द्या.’दरम्यान, प्रास्ताविकांमध्ये दुर्योधन ननावरे यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये गाव सहभागी झाल्याने दोनच वर्षांत गावाचा कायापालट झाला आहे. तसेच गाव टँकरमुक्त झाले आहे, असे सांगितले.त्यावेळी मी थोडासा घाबरलो होतो : खान‘डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण वेळू गावामधील एका हातपंपावर झाले. हातपंपाला एकच हात मारणार, जर पाणी नाही आले तर मी अ‍ॅक्टिंग सोडणार, असा माझा डायलॉग होता. त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो. जर पाणी नाही आले तर... माझ्या अ‍ॅक्टिंगच काय ? असा प्रश्न पडला. परंतु वेळूमध्ये चांगलं काम झाल्यामुळे पाणी निश्चितपणे येणार, असा विश्वास होता. त्यामुळेच मी एक हात मारला अन् हातपंपातून पाणी बाहेर आले,’ अशी माहिती अमीर खान यांनी परिसंवादादरम्यान ग्रामस्थांना दिली.घास उगाना है....पेड लगाना है !पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळू गाव पाणीदार झाले आहे. आणखी पाणलोटचे काम करायचे आहे. मात्र, याबरोबरच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मातीचा कस वाढवायचा आहे. या मातीमध्येच पाण्याच्या उपलब्धतेनुसार घास उगाना है, पेड लगाना है ! ही सर्व कामे केल्यानंतर गाव एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचणार असल्याचे अमीर खान यांनी सांगितले.कोरेगाव तालुक्यातील वेळूतील याच हातपंपावर अमीर खान यांच्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण झाले. यावेळी अमीर खान यांनी एकदाच पंप मारताच पाणी आले.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसर